कधी कधी उभ्या आडव्या रेषा उमटत उमटत खूप किचकट जाळी तयार होते ..
त्यापुढे एकमेकांत गुंफलेले आकार रंगासाठी मोकळे होणे अशक्य होते ...
तरी एक एक आकार गाठीतून सुटा होऊन लागतो आणि एकत्रीत .. तरी स्वतंत्र श्वास घेऊ लागतो ..
पण हे घडणं कधी कधी इतकं किचकट होतं की चित्र पुर्ण होता होता नकोसे होते.
जणु आपणच गुदमरतोय त्यात .
मग चिडून ते चित्र नजरेच्या पल्याड राहते ...
चार सहा महिन्याने पुन्हा त्यावर हात फिरवायला सुरूवात होते ...
तरी मन भरेना .. आणि शांतता लाभेना.
पुन्हा दोन महिने ते नजरे आड जात ...
कधीतरी आठवले की नव्याने रंगांची भर पडते ...
असे घडत घडत एकदाचे तिथेच थांबते ...
पण लांब गेल्यावर त्या चात्राची खरी मजा कळते .. आणि आपल्यालाच मोहात पाडते.
असे काहीसे आपल्या जिवनाचेही होत असते नै !!
.... 30 March 2021. Bhavna
No comments:
Post a Comment