Sunday, January 19, 2020

Girls from kashmir valley

2012 ची काशमीर येथील  आठवणी....
मी, अनिश







व आमचा 9 वर्षांचा लेक अथर्व ..आम्ही बाइकवर मुंबईहून लेह..लदाख व परत मुंबई असा रसता आखला होता.

 संपुर्ण प्रवास नॕशनल हायवेने करायचा. संध्याकाळ झाली की आहोत त्या ठिकाणी हॉटेल पाहून थांबायचे. आमच्यासोबत आणखी चार बाईक होत्या ..दहाबारा मित्रमैत्रिणींचा ग्रूप.

लेहला पोहोचायच्या आदिचे दोन दिवस .. जवाहर टनेल क्रॉस केले ..तेव्हाचा अनुभव छान होता. मुंबईहून आलेले बाईक ..व एक लहान मुलगा त्यात अथर्वला  पाहून तेथील काश्मिरी पोलीसही कौतूक करत होते.

त्या संध्याकाळी वेरीनागला भर पावसात हॉटेल मिळेनासे झाले आणि एका म्हातार्या हॉटेल मालकाने जितक्या खोल्या रिकाम्या होत्या त्या व हॉलमधील टेबल खुर्च्याही काढून रिकामा करून एक रात्र रहायला जागा केली होती.

दुसर्या दिवशी अनंतनागला महाराष्ट्राच्या नंबरप्लेट पाहून तेथील पाटील नावाच्या पी एस आयने बाईक थांबवून आम्हाला त्यांच्या छावणीत जेवायला आमंत्रण दिले तेव्हा आम्हाला  पहायला गाव काश्मिरी गाव जमा झालेला.
तेथील पोरींचे काय कौतूक करू .. खूप सुंदर ... आपण मुंबईकर आहोत हे कळल्यावर घरी जेवायला बोलवायचे. सोबत फोटोही काढून घ्यायचे.

कारगील आधी द्रास लागले अन् विश्रांती साठी अर्धा तास थांबलो. द्रास खूप सुंदर आहे. कारगी जितकं रखरखीत ..द्रास तितकच हिरवगार ..खूप थंडी आणि संपुर्ण डोंगर बारीक पिवळ्या फुलांनी भरलेले दिसत होते ..अगदी कपूर फॕमिलीच्या 80's च्या एखाद्या फिल्मी गाण्याप्रमाणे.
मी हे सर्व सौंदर्य न्याहळत होते आणि जवळच  अथर्व उड्या मारता मारता चिखलात पडला. सोबत मोजकेच कपडे असायचे . बाईकवर तीघे होतोच आणि सोबत बाईकचे टूल .. टायर ट्यूबऔषधं ..थोडेसे कपडे.
  त्याचे अंगावरचे दोन्ही जाकेट खराब झाले ..कसेतरी पुसून घेतले. आतून थर्मोकोट असायचा. पण त्याला पॕन्ट बदलणे गरजेचे होते आणि चिखलाची पॕन्ट धूणे गरजेचे होते. दोन शाळकरी मुली घरातून हसत बाहेर आल्या.  अगदी कॕलेंडरसारखा तो डोंगराळ हिरवगार गवतात वसलेले एकदोन घरांचा सीन होता.
मी वाहत्या ओढ्यात हात टाकायचा प्रयत्न केला पण बर्फाळलेले पाणी..हिंमत कुठच्या कुठे पळली. त्या दोघींनी सहज हातातून कपडे घेऊन धून दिले...

द्रास नंतर कारगीलचे डोंगर पार करायचे होते. सकाळी खाललेल्या मॕगी नंतर दुपार सरू लागली तरी जेवण्यासाठी हॉटेलही दिसले नवौहते. थेट कारगीललाच नशीबात असेलतर जेऊ असे ठरवले होते.

त्या मुलींनी  खूप आग्रहाने जेवायला थांबवायचा प्रयत्न केला  पण संध्याकाळच्या आत कारगील गाठायचे असल्यामुळे आम्हाला थांबणे शक्य नव्हते.
मुंबई म्हट्लं की त्या काश्मिरी मुलींचे डोळे अगदी चमकून स्वप्नमय होत असल्यागत वाटायचं ...
आज काश्मीरमध्ये जे वीश पेरले जातेय ते खूप त्रासदायक आहे. 

No comments:

Post a Comment