आणखी काहीच नको.
यातूनच एक जगणं निर्माण व्हावं ...
वेड असतंय हे ..
उगाच नाही लोक ऐतिहासिक दगडांच्या भींतींवर स्वतःचे नाव कोरण्यात वेळ घालवत ..
माणूस लिहू लागला ते चुकलं खरं
माणूस स्वतःचे नाव लिहायला शिकला ते चुकलं खरं
आता कामाने नावाने जग एकमेकांना ओळखतात !
शिकला नसता तर कदाचित प्रत्येक इतिहास चित्ररूपात नव्याने कोरला गेला असता
एकएक दगडावर ..
तेव्हा प्रत्येक धोंड्याने एकत्रीत नवा इतिहास रचला असता.
माणूस शिकला नसता तर ..
असो ..
जगताना दगडधोंड्यांची सोबत महत्वाची.
ते जगण्याला स्वप्न देतात
नव्याने !
..... Bhavna.
No comments:
Post a Comment